spot_img
spot_img

पाणीदार आ.मा.मंत्री जयकुमार रावल यांचा निष्ठावंत कार्यकर्ता मेळावा संपन्न,,,,

*संपादकीय*

मा.मंत्री आ.जयकुमार रावल : कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात कान धरून मागीतली माफी.

दोंडाईचा :- शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातील महिन्या भरापासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींनंतर काल तालुक्याचे विकासपुरुष पाणीदार आ.मा.मंत्री.जयकुमार रावल यांनी एकनिष्ठ कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केलाहोता.मेळाव्यात मतदारसंघातील अनेक एकनिष्ठ व सच्चा कार्यकर्ता व पदाधिकारी सरपंच भारतीय जनता पक्षाचे प्रमुख ग्रा.प.सदस्य यांनी या राजकीय घडामोडींवर चांगलेच आपले मत व्यक्त करत तोंडसुख घेतले.मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी मा.केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे,भाजपा जिल्हाध्यक्ष बबन चौधरी यांच्यासह जि.प.सभापती सदस्य पं.स.सभापती ,उपसभापती, सदस्य, खरेदी विक्री संघ चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक, बाजार समिती सभापती,उपसभापती, संचालक, दुध संघ चेअरमन व संचालक,विविध गावांचे सरपंच भा. तालुकाध्यक्ष सदस्य बुथप्रमुख शक्ती केंद्रपमुख,पन्नाप्रमुख आदी मान्यवर उपस्थित होते.शिंदखेडा मतदारसंघात मी अनेक विकासाच्या योजना आणून हजारो कार्यकर्त्यांना घडविण्याचे काम केले. त्यातील एक कार्यकर्ता मी अमेरिकेत माझ्या बहिणीला भेटायला गेलो असतांना पाठीत खंजीर खुपसून गेला, याचे दुःख वाटते. जो कार्यकर्ता सोडून गेला त्याला मी तुमच्या सर्वांपेक्षा जास्त पदे दिली होती.मात्र त्याने त्या पदांवर राहून स्वतःचा विकास केला. याबाबत माझ्याकडे सातत्याने तक्रार येत होती. पण मी ती गांभीर्याने घेतली नव्हती. म्हणून मी या एकनिष्ठ कार्यकर्त्यांच्या मेळाव्याव्दारे आपल्या सर्वांची कान धरून माफी मागतो,असे प्रतिपादन मा.मंत्री आ.जयकुमार रावल यांनी केले.यावेळी बोलतांना आ.रावल म्हणाले की, माझ्या समाजकारणात व राजकारणात मी वयाच्या १६ व्या वर्षापासुन काम करीत आहे. यादरम्यान प्रत्येक गावात फिरून मी कार्यकर्त्यांना बळ दिले व संघटीत केले आहे. शिंदखेडा मतदारसंघातील जनता ही माझी भाऊंबदकी आहे, या जोरावर मी विकासाच्या योजना आणल्या. गेल्या २० वर्षात आमदार म्हणून काम करतांना सारंगखेडा, सुलवाडे आणि प्रकाशा बॅरेज, मालपूरचा अमरावती प्रकल्प, वाडी शेवाडी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले. त्यात पाणी अडविले गेले. १९९९ मध्ये मंजूर असलेल्या सुलवाडे जामफळ आणि प्रकाशा जलसिंचन योजनेचे काम युध्दपातळीवर सुरू असून सुलवाडे जामफळमधुन ५१ गावांना सिंचनासाठी थेट शेतापर्यंत पाणी उपलब्ध करून दिले. कोरडीठाक पडलेली बुराई नदी माथा ते पायथा बंधारे बांधून बारमाही केली. ८५ गावांसाठी स्वतंत्र ग्रीड योजनेचे काम सुरू आहे. अनेक महत्त्वाचे रस्ते, हायब्रीड अन्युईटी, मुख्यमंत्री सडक योजना, पंतप्रधान सडक योजनेच्या माध्यमातून केले. हे सर्व माझ्याजवळ राहून पाहणारा तो कार्यकर्ता २४ तासात असा बदलतों की, या मतदारसंघात विकास झालाच नाही. प्रत्येक कार्यकर्त्यांने त्याच्या घरी जावून पहावे. ज्याच्या आज ४-५ अलिशान गाडया अंगणात उभ्या आहेत, त्याना तुम्ही काय समजणार ? ज्या नेत्याने मोठे केले,त्या नेत्याला
एकेरी शब्दांत बोलणे असे संस्कार अचानक कसे आले ? याची बीजे ४ वर्षापासुन रोवली जात असल्याचे मला कळाले. पण कुणाची किती पात्रता आहे हे ठावूक असल्याने एकनिष्ठ कार्यकर्त्यांनी याची अजिबात चिंता करू नये. आजपर्यंतच्या इतिहासात गद्दार कधीच यशस्वी झाल्याचे उदाहरण नाही.त्यामुळे आपण उगीच त्यांचे नांव घेवून त्यांना मोठे करू नये. त्यांना मी जेवढे मोठे केले, पुन्हा त्यांची स्थिती पूर्ववत होईल. मी जो अतिविश्वास त्या कार्यकर्त्यावर ठेवला होता, त्याबद्दल मी एकनिष्ठ कार्यकर्त्यांची कान धरून जाहिर माफी मागतो, असेही आ.जयकुमार रावल यांनी मेळाव्यात स्पष्ट केले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!