*पिक विमा नोंदणीची मुदत दि. ३० जुलैपर्यंत वाढवा, मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, पवार, पालकमंत्री महाजन, कृषीमंत्री मुंडे यांचाकडे धुळे भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांची मागणी*
शिरपुर : राज्यभरातील शेतकऱ्यांचा पिक विमा काढण्याचे काम सुरू झाले आहे. पण विम्याची नोंदणी करण्याची मुदत दि. १५ जुलैपर्यंत ठेवण्यात आली आहे. शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी ही मुदत दि. ३० जुलै २०२४ पर्यंत वाढवावी, अशी मागणी धुळे भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी (दि. १३ जुलै) रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, ना. अजित पवार, कृषीमंत्री ना. धनजंय मुंडे, पालकमंत्री ना. गिरिष महाजन यांचाकडे ईमेल पत्र पाठवुन केली आहे. ‘राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त व्हावे. नैसर्गिक आपत्तीमुळे त्यांच्या पिकातील उत्पन्नात होणारी घट रोखण्यासाठी शासन पीक विमा योजना गेल्या कित्येक वर्षापासून राबवित आहे. यावर्षी देखील शेतकरी पिक विमा योजनेस उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत. पण पीक विमा नोंदणीची मुदत १५ जुलैपर्यंत दिली आहे. सर्व शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ मिळावा या हेतूने दि. ३० जुलै २०२४ पर्यंत मुदत वाढवावी,’ अशी मागणी धुळे भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, ना. अजित पवार, कृषीमंत्री ना. धनजंय मुंडे, पालकमंत्री ना. गिरिष महाजन यांचाकडे यांनी पत्रात नमूद केली आहे.