“भारत बंद”चा प्रभाव मर्यादित; कामगार संघटनांसमोर आत्मपरीक्षणाची वेळ
नंदुरबार : केंद्रीय कामगार संघटनांच्या संयुक्त मंचाने दिलेल्या “भारत बंद”ला देशभर संमिश्र प्रतिसाद मिळाला.काही राज्यांमध्ये आंशिक बंद पाळला गेला, मात्र बहुतांश शहरांमध्ये व्यवहार आणि सार्वजनिक वाहतूक सुरूच असल्याचे दिसून आले.
तज्ज्ञांच्या मते, देशातील ८५–९० टक्के कामगार अनौपचारिक क्षेत्रात असल्याने पारंपरिक संप आणि बंद यांचा प्रभाव कमी होत आहे. गिग अर्थव्यवस्था, कंत्राटी रोजगार आणि स्व-रोजगाराच्या वाढत्या प्रवाहामुळे संघटनांची पकड मर्यादित राहते.
बंदमुळे लघुव्यवसाय, रोजंदारी कामगार आणि नागरिकांना असुविधा सहन करावी लागल्याचीही नोंद आहे. बदलत्या आर्थिक परिस्थितीत संघटनांनी रचनात्मक संवाद साधून कामगार कल्याण आणि विकास यांचा समतोल साधण्याची गरज व्यक्त होत आहे.







